माशांची शिकार की माणसाचा बळी..
माशांची शिकार की माणसाचा बळी? सातपुड्याच्या कुशीतील डोळे उघडणारी एक सत्य घटना... जनगणनेचे काम सुरू होणार होते. मला वाटले होते की, नेहमीप्रमाणे माझ्या परिचयाचे, शाळेचे गावच मला जनगणनेसाठी मिळेल. पण जेव्हा यादी हातात आली, तेव्हा माझ्या गावापासून तब्बल 35 किलोमीटर दूर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले एक दुर्गम आदिवासी गाव मला मिळाले होते. इतक्या लांब आणि अनोळखी भागात काम कसे करायचे, या भीतीने मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली. तेव्हा ते हसून म्हणाले, "मॅडम, एकदा नवीन ठिकाणी जाऊन नवीन अनुभव घेऊन तर या!"काही अडलं तर आम्ही आहोत सहकार्याला..अधिकाऱ्यांच्या त्या शब्दांनी मला धीर दिला आणि मी शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून उत्साहाने त्या आदिवासी भागात प्रवेश केला. तो माझा जनगणनेचा पहिलाच दिवस होता. गावाला लागूनच असलेला एक संथ, सुंदर तलाव आणि निसर्गाचे ते रूप मनाला भुरळ घालणारे होते. पण त्याच दिवशी माझ्या डोळ्यांसमोर अशी एक भयंकर आणि हृदयद्रावक घटना घडली, ज्याने मला अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या त्या 'अनुभवाचा' एक अतिशय वेदनादायी आणि कधीही न विसरता येणारा चेहरा दाख...